Ad will apear here
Next
नव्या पिढीने गिरवले जलसाक्षरतेचे धडे
दापोलीच्या निवेदिता प्रतिष्ठानतर्फे धम्माल शिबिरांतर्गत आयोजन


दापोली :
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील निवेदिता प्रतिष्ठानने बालदोस्तांसाठी नुकतेच धम्माल शिबिर आयोजित केले होते. यात केवळ धमाल न करता प्रतिष्ठानतर्फे देशाच्या या भावी जबाबदार नागरिकांना जलसाक्षरतेचे धडे देण्यात आले. पाणी हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन किती आवश्यक आहे, याची जाणीव सहभागी मुलांना प्रत्यक्ष क्षेत्रभेटीतून करून देण्यात आली.



या मुलांना गिम्हवणे उगवतवाडी येथे नेण्यात आले होते. तेथे वर्षभर जिवंत असणारा झरा या सर्वांनी मिळून स्वच्छ केला. या प्रसंगी जलनायक आणि संस्थाध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी पाण्याच्या थेंबाथेंबाचे महत्त्व बालदोस्तांना समजावून सांगितले. या वेळी संस्थेच्या संचालिका अस्मिता परांजपे, राकेश आंबेरकर, प्रा. शिंदे, नूतन परांजपे, मारुती सपकाळ आणि उगवतवाडीच्या श्री जाकमाता देवी मंदिर मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय लवरे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

(निवेदिता प्रतिष्ठानतर्फे प्लास्टिक आणि कचऱ्याच्या पुनर्वापरासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZONBU
Similar Posts
धम्माल शिबिरात मुलांनी अनुभवली बिनभिंतीची शाळा दापोली : तालुक्यातील जालगाव येथील निवेदिता प्रतिष्ठानतर्फे दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्रपालीच्या आमराईत दोन दिवसीय धम्माल शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मुलांनी वेगवेगळ्या विषयांची माहिती घेऊन बिनभिंतीच्या शाळेचा अनुभव घेतला.
कचरा नव्हे, ही तर संपत्ती! रत्नागिरी : कचऱ्याचा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे उग्र रूप धारण करतो आहे. त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली न जाणे हे त्यामागचे कारण; पण बहुतांश प्रकारच्या कचऱ्याचा पुनर्वापर करता येतो. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील निवेदिता प्रतिष्ठानने हे स्वतःच्या प्रयोगांतून सिद्ध केले आहे. त्यांनी
प्रादेशिक भाषांच्या अभ्यासाकरिता सायकलवरून भारतभ्रमण दापोली : देशभरातील प्रादेशिक भाषा अर्थात त्या त्या ठिकाणच्या नागरिकांच्या मातृभाषा या विषयावर अभ्यास करण्यासाठी डोंबिवलीचे गंधार कुलकर्णी सायकलवरून भारतभ्रमणाला निघाले आहेत. या प्रवासादरम्यान नुकतेच ते रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत पोहोचले. त्या वेळी त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) जिल्हाध्यक्ष
निवेदिता प्रतिष्ठानतर्फे इको-फ्रेंडली गुढीची निर्मिती दापोली : गुढीपाडव्यानिमित्त दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठानतर्फे पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) गुढीची निर्मिती करण्यात आली आहे. गुढी उभारण्यासाठी दर वर्षी बांबूची मोठ्या प्रमाणावर तोड केली जाते. हे प्रमाण कमी व्हावे यासाठी या वर्षी पर्यावरणपूरक गुढीचा लक्षवेधी प्रकल्प ‘निवेदिता’मार्फत हाती घेण्यात आला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language